मुंबई

जुहू प्रकरण : दारूच्या नशेत असलेल्या 'त्या' महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई

अनिश पाटील

मुंबई  : मुंबईतील जुहू येथे महिला पोलिस दारूच्या नशेत स्थानिकांसोबत असभ्यरितीने वागून वाद घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या महिला पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्रुतिका (नाव बदललं आहे) 24 जुलैला जुहूच्या इस्कॉन मंदिरात सकाळी कार्यरत होत्या. त्यादिवशी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर त्यांनी घरी जाणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तसं न करता त्या जुहूतील रुईया पार्क येथील मोरागांव येथे जाऊन दारू प्यायल्यात. दारूच्या नशेत त्यांचे तिथल्या एका नागरिकांशी क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. महिला हवालदाराने  नागरिकांशी भांडणही केले. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

महिला पोलिसांच्या या असभ्य वर्तनाची गंभीर दखल  वरिष्ठांनी  आता घेतली आहे. खाकीमध्ये असताना अशाप्रकारे नागरिकांशी असभ्य वर्तन करणे पोलिस दलाच्या शिस्तीस अशोभनीय असल्याचा शेरा वरिष्ठांनी नोंदवत त्या महिला हवालदाराला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश आता दिलेले आहेत. 

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

( संपादन - सुमित बागुल )

juhu case drunk lady police havaldar suspended from duty read full news



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT