Murder case
Murder case sakal
मुंबई

नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या; ठाण्यातील दुसरी घटना

सकाळ डिजिटल टीम

ठाणे जिल्ह्यात घरगुती किरकोळ घटनांवरुन महिलांच्या हत्याप्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भाईंदर टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने आपल्या 40 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणावरुन ठाण्यात खळबळ उडाली आहे. (Man killed wife after getting angry over excess salt in breakfast)

भाईंदर पूर्वेकडील फाटक रोड परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव वर्षीय निलेश घाघ आहेत.

सकाळी 9.30 च्या सुमारास पत्नी निर्मलाने न्याहारी केली. पत्नीने दिलेल्या 'खिचडी'मध्ये जास्त मीठ असल्याने आरोपी पती संतापला आणि त्याने चक्क पत्नीची कपड्याने गळा आवळून हत्या केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

ठाण्यात घरगुती हिंसाचार आणि हत्येच्या प्रकरणात वाढ होताना दिसतेय. या आठवड्यात गुरूवारी ठाण्यातील राबोडी भागात अशाचं प्रकारची घटना घडली होती. चहासोबत नाश्ता वेळेवर न दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने सुनेवर गोळी झाडली होती. शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT