abi.jpg
abi.jpg 
पुणे

'भामा आसखेड'च्या पुणे जलवाहिनीचे काम बंद ठेवण्याबाबत शेतकऱ्यांनी उचलले मोठे पाऊल

सकाळवृत्तसेवा

आंबेठाण (पुणे) : भामा आसखेड प्रकल्पाच्या पुणे जलवाहिनीचे काम बंद ठेवण्यावर शेतकरी ठाम राहिले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात ठरल्याप्रमाणे शासन वागत नसल्याची तीव्र प्रतिक्रिया  आंदोलकांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भामा आसखेड धरणग्रस्त प्रकलपग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित असताना आणि ठरल्याप्रमाणे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बाकी ठेवायचे असताना सुद्धा पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आज सुरू केल्याने आक्रमक झालेल्या भामा आसखेड आंदोलकांनी हे काम बंद पाडले. काम बंद पाडल्याने चाकण पोलिसांनी शेतकऱ्यांना पोलिस स्टेशनला बोलावून काम सुरू ठेवण्याबाबत सूचना केल्या, परंतु काम बंद ठेवण्यावर शेतकरी ठाम राहिले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात ठरल्याप्रमाणे शासन वागत नसल्याची तीव्र प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

आसखेड खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत सुरू करण्यात आलेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतकऱ्यांना विचारात घेऊन पुढील कार्यवाही व्हावी अन्यथा शेतकरी आंदोलनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सत्यवान नवले, शांताराम शिवेकर, नथू धंद्रे, विलास नवले, अजय नवले आदी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना जमीन वाटप करावे, अपात्र शेतकऱ्यांना योग्य पॅकेज द्यावे तसेच तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा या प्रमुख मागण्यांसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात, न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे ताबे मिळावेत, वाढीव मोबदला मिळावा आणि बाधित गावांना नागरी सुविधा मिळाव्यात अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करून काम बंद पाडले होते.

शेवटी तत्कालीन पालकमंत्री, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात ठरल्यानुसार एक किलोमीटर जलवाहिनीचे काम थांबवून अन्य काम सुरु करण्याचे ठरले होते आणि तसे झालेही. परंतु आज अचानक हे कामही सुरू केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ते बंद पाडले. त्यानंतर शेतकऱ्यांना चाकण पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. सत्यवान नवले, देविदास बांदल यांनी पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. याप्रसंगी गजानन कुडेकर, गणेश जाधव, तुकाराम नवले, देविदास जाधव हे शेतकरी, तर प्रशासनच्या वतीने प्रांताधिकारी संजय तेली, सहायक पोलिस उपायुक्त स्मिता पाटील,सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के उपस्थित होते.

या वेळी प्रांताधिकारी संजय तेली यांनी उद्यापासून काम सुरू करणार असून १०० मीटरचे काम बाकी ठेऊ आणि लवकरात लवकर पुढील मिटिंगचे आयोजन करू, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT