school 
पुणे

'लाॅकडाऊन'मध्ये शाळांचे शुल्क भरण्यास सक्ती नको; शिक्षण विभागाचे आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - एकीकडे संपूर्ण देश लाॅकडाऊन झालेला असताना शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लाॅकडाऊन काळात शुल्क वसुलीसाठी पालकांना सक्ती करू नये असे आदेश सोमवारी काढले आहेत, यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

'कोरोना'चे संक्रमण वाढत असल्याने १४ एप्रिल पर्यंत देशात संचारबंदी रहाणार आहे. सर्वांनी घरातच थांबावे, बाहेर पडल्यास 'कोरोना'ची लागन होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक शाळा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क जमा करण्यासाठी तगादा लावत आहेत. शाळांकडून पालकांना वारंवार मेसेज पाठविले जात असल्याने शुल्क भरायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यासंदर्भात अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपसचिव राजेंद्र पवार यांनी लाॅकडाऊन काळात शाळेचे शुल्क जमा करण्यासाठी सुट दिली आहे, असे परिपत्रक काढले आहे. 

'कोरोना' लाॅकडाऊन मुळे राज्यात संपूर्ण हालचालीवर बंधने घालण्यात आल्याने नागरिकांकडे पैशाची चणचण निर्माण झाली आहे. एसएससी, सीबीएससी यासह सर्व बोर्डाच्या संस्थांनी चालू व आगामी वर्षाचे शुल्क जमा करताना सहानूभूती दाखविणे आवश्यक आहे. लाॅकडाऊनच्या काळात शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये. संचारबंदी संंपल्यावर पालकांना शुल्क भरण्यासाठी सूचना करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहेत. 

दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लाॅकडाऊन काळात शुल्क भरण्यासाठी सक्ती करणार्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT