Chief Minister Eknath Shinde inspecting the damaged grape crop due to unseasonal rain and hail and taking information from the farmers. esakal
नाशिक

CM Eknath Shine : राज्य सरकारकडून शेतकरी हिताचेच निर्णय : मुख्यमंत्री शिंदे

नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच निर्णय

सकाळ वृत्तसेवा

CM Shinde Unseasonal Rain Damage Survey : ‘महाराष्ट्रातील माझ्या शेतकरीराजाला वारंवार येणाऱ्या अवकाळी, गारपीट अशा नैसर्गिक संकटापासून वाचव, पुन्हा त्याच्यावर ही वेळ आणू नको’ अशी विनंती मी रविवारी (ता. ९) अयोध्येत प्रभू रामचंद्रांकडे करून आज (सोमवारी) इकडे बागलाणच्या शेतकऱ्यांकडे धावत आलो. (cm eknath shinde statement unseasonal rain damage Decisions taken by state government in interests of farmers nashik news)

बागलाण तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांना नुकसानीची माहिती देताना आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण

राज्यातील युतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे, तुमचे सरकार आहे. राज्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार असल्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेतोय. अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपुढे कोणाचेही काही चालत नाही. त्या तडाख्यातून शेतकऱ्याला स्थिर करण्यासाठी योग्य निर्णय घेत आहोत.

शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे (ता. बागलाण) येथे शेतकऱ्यांना दिले.

बागलाण तालुक्यात तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानग्रस्त करंजाड, निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील शेतकऱ्यांची बांधावर भेट घेऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.१०) दुपारी तातडीने तालुक्यात आले होते.

त्या वेळी मुरलीधर पवार, नरेंद्र पवार, शरद जाधव आदी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त कांदा, द्राक्ष, डाळिंब, पपई, गहू, हरभरा यांसह भाजीपाला पिकांची पाहणी करून बांधावरच शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, की शासन या नैसर्गिक तडाख्यातून शेतकऱ्याला स्थिरस्थावर करण्यासाठी योग्य निर्णय घेत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाला शासन जे जे देते, त्याला अजून काही जोड देता येईल का? याचा विचार आम्ही करीत आहोत.

द्राक्ष, डाळिंब या नगदी पिकांना अवकाळी व गारपिटीपासून वाचवण्यासाठी अस्तरीकरण, आच्छादनाचे कवच देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. सध्याच्या या नैसर्गिक आपत्तीत एकूणच शासकीय यंत्रणेला अलर्ट केले आहे.

सर्व पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यास नुकसानभरपाई देऊ. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मुरलीधर पवार यांच्या डाळिंब पिकाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण आदी.

पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशवराव मांडवडे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, नानाजी दळवी, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, अरुण सोनवणे, बिंदू शर्मा,

आखतवाडेचे सरपंच अशोक खैरनार, बिजोटेचे सरपंच पोपट जाधव, गोराणेचे सरपंच दिनेश देसले, डॉ.शेखर मुळे, बळिराम जाधव, भाऊसाहेब कापडणीस, भाऊसाहेब अहिरे, युवराज पवार, नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, सटाणा बाजार समितीचे संचालक पंकज ठाकरे,

संजय बिरारी, वसंत पवार, शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, मुख्यमंत्र्यांचे सचिव सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, कृषी अधिकारी सुधाकर पवार आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पपई पिकाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, केशव मांडवडे आदी

दौऱ्याची क्षणचित्रे

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ठीक अडीचला ढोलबारे येथे युद्धपातळीवर बनविण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमन. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

• यानंतर शिंदे यांनी आपला ताफा तत्काळ नुकसानग्रस्त करंजाड, निताणे, आखतवाडे, बिजोटे या गावांकडे वळवला.

• शेतात साचलेल्या चिखलातून मार्ग काढीत मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त कांदा, द्राक्ष, डाळिंब, पपई, गहू, हरभरा यांसह भाजीपाला पिकांची पाहणी.

• गारपीट व अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री बागलाण दौऱ्यावर आल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

• दोन-तीन दिवसांत सरसकट पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.

• नुकसानग्रस्त फळबागांसाठी दोन लाख रुपयांची तातडीने मदत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अवकाळी पावसामुळे शेतात साचलेल्या चिखलातून मार्ग काढत थेट बांधावर पाहणी करण्यासाठी पोचलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे.

मुख्यमंत्री म्हणाले...

• राज्यातील सर्वच शेतकरी, कष्टकऱ्यांच्यामागे सरकार.

• केंद्र शासनाच्या सहा हजार रुपयांच्या पीएम किसान योजनेत वाढ करून राज्य शासनाने ती १२ हजार रुपयांची केली

• सर्व नियम बाजूला ठेवून आजपर्यंत सरसकट नुकसानभरपाई दिली.

• कांद्याला प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान दिले.

• नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारास ५० टक्के अनुदान दिले.

• सतत शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे सरकार म्हणून विश्वास ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT