akola If we return from the red zone, there will be village closures, migration in Zilla Parishad schools and institutional segregation 
विदर्भ

रेड झोनमधून परतलात तर  होणार गावबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवासी संस्थात्मक अलगीकरणात

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आवागमनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी परजिल्ह्यात काही कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नुकतेच अटी-शर्तींवर अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे.

त्यापैकी १८४४ प्रवासी हे कोरोना विषाणूमुळे रेड झोन जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. संबंधित प्रवाशांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले असून अलगिकरणाचा कालावधी पूर्ण होई पर्यंत त्यांना गावांमध्ये फिरण्यास बंदी लावण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते. परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्याठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या सोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता आहे. परिणामी अशा नागरिकांची जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये तपासणी करण्यात येत आहे.

तपासणीदरम्यान संशयित आढळणाऱ्या व्यक्ती अलगीकरणात ठेवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रेड झोन मध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात परतलेल्या १८४४ प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून परतलेल्या ३१६ नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यासोबतच परप्रांतातून आलेल्या १५८ नागरिकांना सुद्धा संस्थात्मक अलगीकरणात
ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी खंडित होण्यास मदत होईल, असा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.


असे आहेत रेड झोन मधून परतलेले प्रवासी
कोरोना विषाणूमुळे रेड झोन मध्ये समावेश करण्यात आलेल्या जिल्ह्यातून परतलेल्या १८४४ प्रवाशांपैकी सर्वाधिक ४६६ प्रवासी बार्शिटाकळी तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यात २८०, बाळापुर व पातुर तालुक्यात २७३, अकोला तालुक्यात २१७, अकोट मध्ये १६४ व तेल्हारा तालुक्यात १७१ प्रवासी परतले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT