Rajnath Singh
Rajnath Singh 
देश

सर्जिकल स्ट्राईकनंतर घुसखोरीत 45 टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक्सनंतर घुसखोरीचे प्रमाण तब्बल 45 टक्क्यांनी घटले असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (शनिवार) येथे केला. 

केंद्र सरकारच्या गेल्या तीन महिन्यातील कामाचा पत्रकार परिषदेत आढावा घेताना राजनाथ यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अधिक सुधारली असल्याचे सांगितले आणि दहशवादाचे पूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

ते म्हणाले, 'सुरक्षा दले आणि जम्मू काश्मीरमधील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा आम्ही नायनाट करू.' राजनाथ यांनी यासाठीचा निश्चित कालावधी सांगितला नाही; मात्र एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, 'काश्मीरचा प्रश्न 1947 पासून अस्तित्वात आहे आणि काही महिन्यांत त्याची सोडवणूक करता येणार नाही.'

'काश्मीर प्रश्न 'चुटकीं में' सुटू शकणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. मात्र, आम्ही कायमस्वरूपी उपाय करू. त्या दिशेने आम्ही जात आहोत,' असे त्यांनी सांगितले. 

भारतामध्ये जगातील दुसऱया क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असतानाही 'इसिस'ला भारतात प्रवेश करणे शक्य झाले नाही, हे यश असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. 'गेल्या तीन वर्षांत 'इसिस'शी लागेबांधे असलेल्या 90 हून अधिक लोकांना अटक केली आहे. 'इसिस'शी आम्ही यशस्वी मुकाबला करीत आहोत,' असेही त्यांनी सांगितले. 

जम्मू-काश्मीरमधील घुसखोरी, माओवाद्यांचा हिंसाचार आणि ईशान्य भारतातील घुसखोरीमध्ये गेल्या तीन वर्षांत घट झाल्याचा दावा राजनाथ यांनी आकडेवारीसह केला. गेल्या तीन वर्षांत माओवाद्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण 25 टक्क्यांनी घटले आहे. हल्ल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे आणि माओवाद्यांच्या शरणागतीमध्ये 182 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT