Aamir ali sanjeeda sheikh got divorced not allowed to meet daughter ayra
Aamir ali sanjeeda sheikh got divorced not allowed to meet daughter ayra Google
मनोरंजन

फेअरीटेल लव्हस्टोरी,मग लग्न आणि अचानक घटस्फोट; आमिर अली चुप्पी तोडत म्हणाला...

प्रणाली मोरे

Aamir ali-sanjeeda sheikh Divorce: आमिर अली आणि संजीदा शेख यांच्या लव्ह स्टोरीनं टी.व्हीच्या दुनियेत एक काळ गाजवला आहे. पण अचानक या क्युट जोडीला कुणाची नजर लागली ठाऊक नाही,दोघांची फेअरीटेल लव्ह स्टोरी एका अशा वळणावर आली जिथं नात्यात प्रेमच उरलं नाही. त्या दोघांना जवळून ओळखणाऱ्या कुणीच या गोष्टीची कल्पना देखील केली नव्हती. अनेक दिवस आपल्या नात्यावर मौन बाळगलेल्या या कपलनं आता आपल्या मनातील भावना समोर येऊन बोलून दाखवल्या आहेत. असं काय झालं की या क्युट कपलमध्ये अचानक दुरावा येऊन सारंच गणित बिघडलं.(Aamir ali sanjeeda sheikh got divorced not allowed to meet daughter ayra)

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आमिर अली म्हणाला आहे, त्याला आपल्या मुलीला देखील भेटू दिलं जात नाहीय आमिरनं पहिल्यांदा संजीदासोबत सुरु असलेल्या नात्यातील संघर्षाला लोकांसमोर ठेवलं आहे. आमिरनं शेअर केलं आहे की,''आम्ही आमच्या आयुष्यातले खूप सुंदर क्षण एकमेकांसोबत घालवले आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं याविषयी लोकांसमोर बोलून एकमेकांना बदनाम का करायचं?'' आमिर अली आणि संजीदा शेखनं २०१२ साली लग्न केलं होतं. कपलला एक गोड मुलगी देखील आहे,तिचा जन्म २०२० मध्ये झाला. आणि त्यानंतर वर्षभरातच दोघांचं विभक्त होणं चाहत्यांसाठी शॉकिंग गोष्ट आहे.

एका मुलाखतीत आमिरने संजींदासोबतच्या नात्याविषयी आणि स्वतःच्या सद्य परिस्थितीविषयी बोलून दाखवले आहे. आमिर म्हणाला की,''ही खूप गंभीर गोष्ट आहे. मला याविषयी कोणाशीच बोलायचे नाही. मला कोणताही कट कोणासोबत करायचा नाही. पण मला वाईट वाटतं की नेहमीच पुरुषालाचा दोषी ठरवलं जातं. मी नेहमी माझं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. मी ज्या व्यक्तीसोबत माझ्या आयुष्यातील इतकी वर्ष एकत्र घालवली, त्याचा अनादर होईल असं मी कसं वागेन. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. मी फक्त प्रार्थना करतो की ती कायम आनंदी राहो. आणि मला आशा आहे माझी मुलगी आयराची देखील नीट काळजी घेतली जात असेल''.

आमिर आपल्या सध्याच्या परिस्थितीसोबत खूश आहे. सध्या तो सिंगल आहे आणि त्याला इतक्या लवकर कोणाशी नातं जोडायचं देखील नाही. संजीदासोबत नातं का तुटलं? यावर आमिर अली म्हणाला- ''मला आजही लग्न या संकल्पनेवर खूप विश्वास आहे. पण माझं सध्याचं सिंगल लाईफ देखील मी एन्जॉय करत आहे. मला वाटतं कोणी ना कोणी तुमच्यासाठी बनलं आहे. आणि एका वाईट अनुभवावरुन तुम्ही इतरांना देखील त्याच नजरेनं पहाणं चुकीचं आहे. कोणतंही नातं कितीही मजबूत का असेना, कुठे ना कुठे त्याचा शेवट हा होणारच असतो. मी खूश आहे की संजीदा आणि मी विभक्त होण्याचा निर्णय एकमतानं घेतला. मी प्रार्थना करतो की संजीदाला एक चांगला जोडीदार पुन्हा मिळो,आणि तिला आयुष्यात आनंद मिळो''.

याउलट संजीदाला घटस्फोटाविषयी विचारले असता तिनं यावर बोलण्यास नकार दिला. संजीदा सध्या आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. संजीदा म्हणाली-''मला घटस्फोटाविषयी काहीही बोलायचे नाही. मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. मला वाटतं माझ्या मुलीला माझा अभिमान वाटेल असं मी काहीतरी करायला हवं. आणि ते लवकरच शक्य होईल''.

आमिर अलीनं एका मुलाखती दरम्यानं सांगितलं होतं की,संजीदासोबत घटस्फोट झाल्यावर तो डिप्रेशनचा सामना करत होता. तो म्हणाला-''हा खूप कठीण निर्णय होता. माझं लग्न तुटल्यानंतर,मला मोठा धक्का बसला होता. माझा स्वभाव तसा काहीही संकटं झेलण्याचा आहे, मी कधी हताश होत नाही. मी नेहमी हसत-खेळत आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतो. कोणाविषयी दुजाभाव मनात ठेवत नाही. माझी पू्र्वाश्रमीची पत्नी आयुष्यात आनंदी राहो. आपल्या आयुष्यात काही घडतं त्याच्यामागे काही ना काही कारण असतं. मी नेहमी असाच विचार करत आलो आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT