Agriculture 
सप्तरंग

घोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच 

डॉ. अजित नवले

सरकारने पिकविम्यासाठी नवीन योजना आणली, परंतु ती शेतकऱ्यांपेक्षा खासगी कंपन्यांच्याच फायद्याची ठरली. शेतमाल बाजार सुधारणांसाठी धोरणात्मक निर्णय घेतला गेला, परंतु राज्यस्तरावर त्याची अर्धवटच अंमलबजावणी झाली. योजनांतील अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यासाठीचा 'डीबीटी'चा निर्णय स्वागतार्ह आहे. शेतमाल आयात- निर्यातीसंबंधीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पशुधन संरक्षणासाठी नवीन योजना आणली, मात्र त्यासाठीचा निधी अपुरा आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना प्रचंड फटका सोसावा लागला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दाखवलेले दिवास्वप्न कधी सत्यात उतरते याची प्रतीक्षा आहे. 

मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी वाढले. त्या रोखण्यासाठी ठोस प्रयत्न हवेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीकरता तरतूद करावी. कृषी सिंचनासाठीच्या घोषणा स्वागतार्ह असल्या तरी त्यासाठी पुरेशा निधी दिल्यासच अपेक्षित परिणाम साधला जाईल. पीकविम्याची योजना सरकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच राबवावी.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे आश्वासन सरकारने पाळावे. भाव स्थिरीकरण कोष स्थापन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. ग्रामीण क्षेत्रात अधिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामस्तरावरील पायाभूत सुविधांचा विकास यावर भर द्यावा. ढिसाळ अंमलबजावणी आणि अपुरी आर्थिक तरतूद यामुळे शेतीविकासाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यातील त्रुटी दूर कराव्यात. शेतमालाला आधार भावाचे आश्वासन सरकारने पायदळी तुडवले. तुरीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे सोयाबीन, साखर, कांदा, मका, गहू, कडधान्य इत्यादी पिकांचे भाव पडले. सरकारने फक्त ग्राहककेंद्री विचार न करता शेतकऱ्यांच्या हितासाठीही पावले उचलावीत. शेतमालाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. 
 

सरकारच्या कामगिरीला दिलेले गुण - 2 
 

(लेखक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस आहेत)

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:

आणखी ताज्या बातम्या वाचा:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT