आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन? ते महाराष्ट्रात येणाऱ्यांना सक्तीचे क्वारंटाइन

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. तपासणीच्या वेळी ४८ तासांमधील रिपोर्ट सादर करण्याचे बंधन त्यांच्यावर करण्यात आले आहे. तर भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगातील इतर देशांनी आता खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे, राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्‍सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा, या पार्श्वभूमीर राज्यातील विविध विभागांना दिलेल्या सवलती बंद करुन 30 एप्रिलपूर्वी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात नियोजन सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

सोलापूर - कडक संचारबंदी लागू करूनही सात दिवसांत अडीच लखांहून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली आहे. राज्यात मागील सहा दिवसांत तीन लाख 79 हजार 54 रुग्ण आढळले असून दोन हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्‍सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा, या पार्श्वभूमीर राज्यातील विविध विभागांना दिलेल्या सवलती बंद करुन 30 एप्रिलपूर्वी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात नियोजन सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर माजला असताना आता राजधानी दिल्लीला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. पुढील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या टोक गाठणार असल्याचा स्पष्ट इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला. रुग्ण संसर्गाचा दर हा ५० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. वाचा सविस्तर

मुंबई - राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) पथकाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांच्या ठाण्यातील घरी सोमवारी भेट दिली. एनआयएचे नवे महानिरीक्षक ज्ञानेंद्र वर्मा यांनी मनसुख हिरेन हत्येचा आढावा घेण्यास सुरूवात केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर

पुणे - रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. तपासणीच्या वेळी ४८ तासांमधील रिपोर्ट सादर करण्याचे बंधन त्यांच्यावर करण्यात आले आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १५ दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर स्टॅंप मारण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - अवघा देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला असताना केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी सीरमला तीन हजार कोटी तर भारत बायोटेकला दीड हजार कोटींचा निधी दिला जाईल. हा निधी प्रथम कोविडच्या प्रभारी मंत्र्यांकडे दिला जाईल. त्यांच्याकडून जलदगतीने लसनिर्मिती करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडे निधी वर्ग केला जाईल. वाचा सविस्तर

वॉशिंग्टन - भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगातील इतर देशांनी आता खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. ब्रिटनने भारतासह पाकिस्तान, बांगलादेशला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. तर अमेरिकेनंही त्यांच्या नागरिकांसाठी नवीन ऍडव्हायजरी जारी केली आहे. सीडीसीकडून जारी करण्यात आलेल्या या ऍडव्हायजरीमध्ये नागरिकांना भारतात प्रवास करणं टाळा असा सल्लाही देण्यात आला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्ण संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. वाचा सविस्तर

नागपूर - कोविडचे रुग्ण वाढतच चालले असल्याने आता औषधे वगळून अत्यावश्यक सेवा देणारी सर्व दुकाने व बाजारपेठा दुपारी एक वाजता नंतर बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. आजपासून या आधीपेक्षा कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

औरंगाबाद - मराठवाड्यात सोमवारी (दि.19) दिवसभरात 7 हजार 457 कोरोना रुग्णांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; औरंगाबाद 1493, लातूर 1421, नांदेड 1375, बीड 1121, उस्मानाबाद 662, परभणी 573, जालना 521, हिंगोली 219. मराठवाड्यात 113 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमधील 28, औरंगाबाद 24, परभणी 16, नांदेड 15, उस्मानाबाद 10, हिंगोली-बीड प्रत्येकी 9, जालन्यातील दोघांचा समावेश आहे. वाचा सविस्तर

करमाळा (सोलापूर) - सावडी (ता. करमाळा) येथे बाप व दोन मुलींच्या एकाच चितेला अग्नी देण्यात आला. ही काळिज पिळवटून टाकणारी घटना पाहण्याची वेळ सावडीकरांवर आली. संपूर्ण गावात या घटनेचा दुखवटा पाळण्यात आला. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com