Kolhapur Circuit Bench
मागच्या ४० वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले. याला आता यश आले आहे. १८ ऑगस्ट २०२५ साली कोल्हापुरात सर्किट बेंचच्या कामाला सुरूवात झाली. याचे उद्घाटन सरन्यायाधिश भूषण गवई यांनी केले यावेळी अवघे कोल्हापूरकर एकवटले होते. सर्किट बेंचमध्ये ५ जिल्ह्यांचे काम चालणार असून कोल्हापूर, पुणे, कोकण, सोलापूर, सातारा जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.